नवी दिल्ली – शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाने एक वेगळीच दुनिया सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर आणली आहे. टेलिव्हिजन माध्यमाचा उपयोग आजवर खरंतर फक्त मनोरंजन यापुरताच केला गेला आहे. पण या कार्यक्रमातून प्रेक्षकांना व्यवसायाबाबत विचारसरणी आणि दृष्टीकोन कसा असायला हवा याचे ज्ञान घराघरात बसलेल्या पाहायला मिळते आहे.
यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले BharatPay चे व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांनी फिनटेक भारतपेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की,’ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, त्या कंपनीचा आज मला निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे. याचं मला खूप दु:ख आहे. मी मान उंच करून सांगतो की आज ही कंपनी फिनटेकच्या जगातील सर्वोत्तम कंपनींपैकी एक आहे. 2022 च्या सुरुवातीपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काही लोकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. जे केवळ मला आणि माझ्या प्रतिष्ठेलाच नव्हे तर कंपनीच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचवण्यास तयार आहेत.’
दरम्यान,’अशनीर ग्रोव्हर यांनी सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरकडे वाद याचिका दाखल केली होती. आपल्या अपीलमध्ये, ग्रोव्हर यांनी विनंती केली की तपास बेकायदेशीर आहे कारण तो भागधारक कराराचे उल्लंघन करतो. ८.५ टक्के स्टेक विकून कंपनी सोडण्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना ४००० कोटी रुपये देण्याची मागणी केली होती, तथापि, न्यूज एजन्सी IANS नुसार फिनटेक प्लॅटफॉर्ममधील शीर्ष गुंतवणूकदार मागे हटायला तयार नाहीत. २.८५ अब्ज डॉलर्स मुल्यांकनावर आणि सध्याच्या डॉलर-रुपया विनिमय दरानुसार, त्यांची हिस्सेदारी सुमारे १,८२४ कोटी रुपये असेल.’ असेही ते म्हणाले