पाकच्या गोळीबारात दोन जवान शहिद
नवी दिल्ली : भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, प्रत्युत्तर देताना दोन भारतीय जवान शहिद झाले आहेत. तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर घुसखोरी हाणून पाडत भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली अनेक दहशतवादी कॅम्प उद्वस्त केले असल्याचे म्हटले जात आहे.
Jammu and Kashmir: Besides the death of 2 Army jawans & a civilian in the ceasefire violation by Pakistan in Tangdhar sector today, 3 others were injured. 1 house and a rice godown completely damaged, 2 cars damaged and 2 cow shelters with 19 cattle & sheep inside, destroyed. https://t.co/Gm4a48s79l
— ANI (@ANI) October 20, 2019
कलम 370 रद्द केल्यापासून भारतात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, या उद्देशाने पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमधील सीमेलगतच्या तंगधार सेक्टरमध्ये आज सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून अचानक भारतीय चौक्यांसह सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करण्यात आले.
शस्त्रसंधी उधळून लावत पाकिस्तानने गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना भारताचे दोन जवान शहीद झाले. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकच्या गोळीबारात एक घर आणि तांदळाचे गोडाऊन जमीनदोस्त झाले असून, त्यामध्ये असलेल्या दोन कार, दोन गाई आणि शेळ्या-मेंढ्या मरण पावल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला चढवला आहे. दहशतवादी तळ उद्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा वापर करण्यात आला. यात दहशतवादी तळ नष्ट करण्यात लष्कराला यश मिळाले आहे.