Article 370 : जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आज (दि.11) सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बीआर गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
या प्रकरणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग 16 दिवस सुनावणी झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर 2023 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आता 96 दिवसांनंतर सोमवारी म्हणजेच 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकिय आणि मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया येत आहे.
अश्यातच, काश्मिर फाईल्स फेम अभिनेते अनुपम खेर यांनी कलम 370 रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
कलम 370 रद्द करणे आवश्यक होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आता, मला विश्वास आहे की त्यावरील सर्व वादविवाद संपले असतील. असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
#Article370 #SupremeCourt #Kashmir #JaiHind 👍🇮🇳 pic.twitter.com/nyP0Ri23oC
— Anupam Kher (@AnupamPKher) December 11, 2023
तर दुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही या निर्णयावर भाष्य करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कलम 370 रद्द केल्याबद्दल सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. न्यायाचा अधिकार कायम ठेवल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानतो.
First, I congratulate and thank @narendramodi & @AmitShah for abrogating Article 370. I also thank SC for upholding the #RightToJustice.
Justice SC Kaul’s has made a very important recommendation. It’s time India sets up TARC for all the Genocides of last 75 years. Starting… https://t.co/Y35hvS8Yrb
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) December 11, 2023
न्यायमूर्ती एस सी कौल यांनी अत्यंत महत्त्वाची शिफारस केली आहे. गेल्या 75 वर्षांतील सर्व नरसंहारांसाठी भारताने TARC स्थापन करण्याची वेळ आली आहे. डायरेक्ट अॅक्शन डे पासून ते 2020 च्या दिल्ली दंगलीपर्यंत….आता वेळ आली आहे की भारताने नरसंहार आणि नागरिक #RightToLife ला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.’ या आशयाचे ट्विट त्यांनी केली आहे.