24 तास पाण्याचे नियोजन शहराच्या पूर्ण भागाला 24 तास आणि पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या भामा- आसखेड योजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी टिंगरे यांनी महापालिकेपासून ते राज्यशासना पर्यंत वारंवार पाठपुरावा केला असून प्रसंगी महापालिकेत सत्तेत असून मुख्यसभेत आंदोलन करून प्रभागाच्या पाणी समस्येकडे लक्ष वेधले आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, टिंगरे यांनी या भागासाठी सुमारे 25 लाख लीटर क्षमतेच्या दोन टाक्या महापालिकेच्या माध्यमातून उभारल्या आहेत, तर अस्तिवातील टाक्यांना जोडणाऱ्या तसेच जुन्या झालेल्या सर्व पाण्याच्या जलवाहिन्याही या प्रभागात बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षभरातच या भागाला चोवीस तास पाणी मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून पाणी नसल्यामुळे नागरिकांची होणारी अडचण पुढील काही महिन्यात दूर होणार आहे. या सोबत टिंगरे यांनी प्रभागात जुन्या जलवाहिन्या बदलून प्रभागातील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्याही सोडविण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.
वेगाने वाढते नागरिकरण आणि या वाढत्या नागरीकरणाला तेवढयाच सक्षमतेने आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असते. या दोन्ही घटकांच्या वेगात बदल झाला की नागरिकरणाच्या अनेक समस्या वाढतात. मात्र, महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 कळस-धानोरी या नियमावाला अपवाद ठरला आहे. वाढते नागरिकरण आणि त्याच वेगाने विकासाची गती ठेवण्याची किमया महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 1 मधून विद्यमान नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी गेल्या 15 वर्षात अविरतपणे सुरू ठेवली आहे.
गेली 15 वर्षे या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून सद्यस्थितीत असलेल्या नागरिकरणाच्या समस्यांवर नेमका उपाय , भविष्यातील गरजा आणि नियोजनात्मक विकास साधण्याची दूरदृष्टी ठेऊन, पर्यावरण संवर्धन जपत टिंगरे यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे भौतिकदृष्टया महापालिकेचा एक क्रमांकाचा प्रभाग म्हणून कळस-धानोरी हा भाग ओळखला जात असला तरी, गेल्या दिड दशकता टिंगरे यांनी केलेली विकासकामे आणि पुर्णत्वास असलेल्या विकासकामांमुळे हा प्रभाग विकासातही क्रमांक 1 चा ठरला आहे.
प्रभागाच्या सुरक्षेचीही सांभाळली जबाबदारी
प्रभागातील नागरिकांना केवळ रस्ते, पाणी, ड्रेणेज या सुविधा देणे एवढेच नगरसेवकाचे काम नाही. त्या पलीकडे जाऊन प्रभागातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा तसेच त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आपल्याच भागात मिळाव्यात यासाठी टिंगरे नेहमीच आग्रही असतात. त्यातूनच त्यांनी धानोरीसाठी स्वतंत्र पोलीस चौकी असावी यासाठी विशेष प्रयतक् केले. त्या पुढे जाऊन त्यांनी धानोरी परिसरात सुरक्षेसाठी प्रत्येक मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, मुख्य चौक, तसेच सर्व प्रमुख धार्मिक स्थळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही घटले आहे. या शिवाय, या भागात पोस्ट ऑफीस नसल्याने नागरिकांना 4 किलोमीटर दूर असलेल्या दिघी मध्ये जावे लागत आहे. आता टिंगरे यांनी पुढाकार घेत महापालिकेच्या माध्यमातून या भागासाठी पोस्टऑफीसला जागाही मिळवून दिली असून लवकरच धानोरीत ते सुरू केले जाणार आहे. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण प्रभागात विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम 70 टक्के झाले असून त्यानंतर आता पाण्याच्या नवीन लाईन टाकणे आणि नंतर सिमेंटचे पक्के रस्ते करण्यात येणार आहेत.
मुलांसाठी क्रीडासंकूल
महापालिकेच्या वाढीव हद्दीत आलेल्या या भागात तुलनेने मैदानांचीसंख्याही कमी आहे. त्यामुळे धानोरी आनंद पार्क, सर्व्हे नं. 90 मध्ये बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव उभारण्याचे काम सुरू आहे. या शिवाय, या ठिकाणी सुमारे 15 हजार चौरस फुटाचा बहुद्देशीय हॉलही उभारण्यात येत आहे. हे काम संपण्याच्या मार्गावर असून लवकरच त्याचे लोकार्पन केले जाणार आहे. या शिवाय, क्रीडा समिती अध्यक्ष असताना टिंगरे यांच्या माध्यमातून उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळया शिष्यवृत्ती, स्पर्धाचे आयोजन असे अनेक कार्यक्रमही घेण्यात आले तसेच प्रत्येक वर्षी ते सातत्याने घेण्यातही येत आहेत.
प्रभागासाठी स्वतंत्र एसटीपी
प्रभागात निर्माण होणारे सांडपाणी थेट नाल्यात सोडले जाते. त्यामुळे हे सांडपाणी संकलीत करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रभागाला स्वतंत्र एसटीपी मंजूर झाला आहे. विश्रांतवाडी येथे हा एसटीपी होणार आहे. त्यापूर्वी या एसटीपीला जोडणाऱ्या सर्व जुन्या तसेच क्षमता कमी असलेल्या ड्रेणेज लाईन बदलण्यात आलेल्या आहेत. त्यात सुमारे 300 हून अधिक जुन्या ड्रेणेज लाईनचा समावेश आहे. वाढत्या नागरिकरणामुळे पूर्वी टाकण्यात आलेल्या लाइनची क्षमता कमी असल्याने या नवीन लाईन टाकण्यात येत आहेत. त्यामुळे लाईन तुंबण्याच्या समस्या लक्षणियरित्या कमी झाल्या असून नागरिकांना, गृहनिर्माण सोसायटयांना त्याचा मोठा फायदा होत आहे.
शहरातील सर्वांत मोठे उद्यान साकारणार
कळस-धानोरी परिसर महापालिकेच्या हद्दवाढीत पालिकेत समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे या भागात फारशी उद्याने नाहीत. ही बाब लक्षात घेऊन टिंगरे यांच्या प्रयत्नातून पु. ल देशपांडे उद्याना पेक्षा मोठे उद्यान या भागात साकारत आहे. धानोरी वनविभागाच्या जागेत हे उद्यान साकारले जाणार आहे. त्यासाठी या उद्यानास संरक्षण भिंत बांधण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून टिंगरे यांनी तब्बल साडेचार कोटींचा निधी आणला. हे सिमाभिंतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शिवाय, या परिसरात तब्बल 5 हजारहून अधिक झाडांचे वृक्षारोपन करण्याची किमयाही त्यांनी साध्य करून दाखविली आहे. त्यामुळे या भागातील पर्यावरण समतोल राखण्यास मदत होणार असून नागरिकांना आरोग्यासाठी एक उत्तम दर्जाचे ठिकाण विकसित होणार आहे.
सीबीएससीची शाळा लवकरच सुरू होणार
कळस-धानोरी भागातील मुंजाबा वस्ती सर्व्हे नं.29 या ठिकाणी सीबीएससी अभ्यासक्रमाची इंग्रजी माध्यम इ-लर्निंग शाळा सुरू होत आहे. चढ, उतार असलेला भाग, मात्र नियोजनात्मक विकास ठेऊन या भागातही टिंगरे यांनी अत्यावश्यक सुविधा प्रत्येक नागरिकाला मिळतील यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. या भागात मध्यमवर्ग तसेच कामगार वर्गाची संख्या लक्षणिय असल्याने त्यांच्या मुलांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने या भागात लवकरच ई-लर्निंग शाळा सुरू होत आहे. खासगी शाळांमध्ये 25 ते 30 हजार रूपयांचे शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. याची जाणीव ठेवून या मुलांना 1 ली ते 7 पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे यासाठी तीन मजली शाळा उभारण्यात आली आहे. लवकरच ही शाळा सुरू होईल असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला.