Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 8 राज्यांतील 49 जागांवर सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच 13 लोकसभेच्या मतदानाने सांगता होईल.
महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल – आशिष शेलार
नुकतेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, “मी मतदारांना आवाहन करतो की, दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. ECI ने चांगली व्यवस्था केली आहे आणि लोकांनी ECI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. मी लोकांमध्ये भाजपबद्दल उत्साह पाहिला आहे. विशेषत: पीएम मोदींच्या रोड शोममुळे महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल.”
#WATCH | Mumbai BJP president Ashish Shelar says, “I appeal to the voters to participate in this festival of democracy that comes after every five years. ECI has made good arrangements and people should follow ECI’s guidelines… I have seen enthusiasm in people for the BJP,… pic.twitter.com/kHx0emELvg
— ANI (@ANI) May 20, 2024
आशिष शेलार यांनी देखील दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यास सांगत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गेल्या महिन्याभरात या उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला.
तर, उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक नेत्यांनी प्रचारसभा जोरदार प्रचारही घेतला. कडाक्याचे ऊन असो किंवा जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस असो, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यात कोणतीही कमतरता सोडली नाही. पंतप्रधान मोदींचा मुंबईतील रोड शो देखील चांगलाच चर्चेत आला होता.
हेही वाचा:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे मतदारांना आवाहन, म्हणाले,” तुमच्या एका मताच्या जोरावर…”