उमा भारती यांचे आणखी एक वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर काही दिवसांपुर्वी झालेल्या जीवघेण्याच्या हल्ल्याची जेएनयू हल्ल्या प्रकरणी देशभरात रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर देशातील राजकीय पक्षातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातच भाजप नेता उमा भारती यांनी खोचक प्रतिक्रिया देत नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे.
BJP leader Uma Bharti on #JNUViolence: There are some thinkers in the country who are like a particular snake which is less in number but is highly venomous… Efforts are being made to make environment venomous… We have to fix some things & we will fix them. pic.twitter.com/JfHBXRsb8J
— ANI (@ANI) January 8, 2020
उमा भारती म्हटले,’देशात काही विचारवंत विषारी सापासारखे आहे जे संख्येने कमी मात्र फार विषारी आहे. ते नेहमी प्रयत्न करत असतात की, देशातील वातावरण हिंसक, विषारी व्हावे. म्हणून आम्हाला येत्या काळात आम्ही ते नीट करू.’ दरम्यान, त्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांची तुलना विषारी सर्प अशी केल्यामुळे सध्या सोशल मीडियावर उमा भारती यांचा व्हिडियो वायरल होत आहे.