इराणचे राजदूत अली चेगेनी यांचा भारताकडे प्रस्ताव
नवी दिल्ली : सध्या जगात इराण आणि अमेरिकेत सुरू असणाऱ्या तणावाच्या वातावरणाचीच चर्चा सुरू आहे. दोन्ही देशातील परिस्थिती ही अत्यंत टोकाची झाली आहे. दरम्यान,हीच परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी भारताने पुढाकार घेण्याचा घ्यावा अशी माणगी इराणकडून करण्यात आली आहे. जगात शांतता नांदावी यासाठी भारताने आजपर्यंत खूप चांगले प्रयत्न केले आहेत. हा देश शांततेचा पुरस्कर्ता आहे. भारत आमचा चांगला मित्र आहे त्यामुळे शांततेसाठी मध्यस्थी करण्यात भारतानं पुढाकार घ्यावा, असं इराणचे दूत अली चेगेनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. पुढील आठवड्यात इराणचे पराराष्ट्र मंत्री जवाद झारीफ हे भारतात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अली यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं.
Iran not looking for war, airstrike in Iraq part of our response, says Tehran’s envoy to India
Read @ANI Story | https://t.co/t0tY39qQqq pic.twitter.com/I9zQIkEmwg
— ANI Digital (@ani_digital) January 8, 2020
इराणचे पराराष्ट्र मंत्री 14 जानेवारीला नवी दिल्लीत येणार आहेत. ते भारताचे पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. सध्या इराण-अमेरिकेत तणाव आहे. कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिका दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र डागले आहेत. बुधवारी सुमारे साडेपाच वाजता इराकमध्ये अमेरिका सैन्य असलेल्या हवाई तळांवर एकापाठोपाठ एक असे क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांना तास उलटत नाही तोच पुन्हा इराकची राजधानी बगदादमधील सुरक्षेची तटबंधी असलेल्या ग्रीन झोनमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
ही तणावपूर्ण परिस्थिती असताना इराणच्या दूताने भारताचा उल्लेख अत्यंत चांगला मित्र असा केला आहे. आम्ही प्रत्येक देशाला पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र भारत हा आमचा चांगला मित्रदेश आहे त्यामुळे त्यांनी पुढाकार घ्यावा असे अली म्हणाले. अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र आम्ही डागली, मात्र तो सूड नक्कीच नव्हता. आमच्या लोकांसाठी जे योग्य होते तेच आम्ही केले असे अली म्हणाले.