मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात एक अत्यंत महत्वपूर्ण घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला अंतिम निर्णय दिला असून, आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. अश्यातच, आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे.
1 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाकरे कुटुंबीयांच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या पत्नी ‘रश्मी ठाकरे’ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता या प्रकरणातील आणखी सात आरोपींविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे परिवाराचा 19 बंगला घोटाळा
रेवदंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
FIR २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ३४
श्रीमती संगिता भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्यां विरुद्ध फसवणूक… १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे तक्रार दाखल केली pic.twitter.com/xyEuNbUrbP
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 24, 2023
एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. सात जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विट आकाउंटवर शेअर केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण चांगलाच उचलून धरलं असल्याचं दिसून आलं होत.