नगर – निर्भयाच्या मारेकऱ्यांना तात्काळ फासावर लटकविण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सुरु असलेल्या मौन आंदोलनास एकीकडे अनेक नागरिकांकडून पाठिंबा देण्यात येत आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांंनी अण्णांना सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं, असं आवाहन केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले,’अण्णा हजारे नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्यावर उपोषण करत असतात. जर आता आण्णांकडे थोडीशी माणुसकी असेल तर अण्णांनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं, एका जाहीर सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, एनआरसी सीएए कायद्याविरोधात चाललेला लढा आता तीव्र होणार असून दिल्लीच्या जंतरमंतरवर येत्या 4 मार्च रोजी आंदोलनाला सुरवात होणार आहे. यामध्ये अण्णांनीही सहभागी व्हावं, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अण्णा हजारे यांना आवाहन केले आहे.