मुंबई – भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वकरंडक टी-20 स्पर्धा खेळू शकणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच त्याबाबत एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
बुमराह या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर गेला असे मी सध्या बोलू शकत नाही कारण प्रत्यक्ष स्पर्धेला अद्याप काही दिवसांचा कालावधी आहे व त्यापूर्वी त्याने सराव सुरु केला तर आयत्यावेळी देखील त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, असे गांगुली सांगितले आहे.
अवे फॉर्म बॉडी गोलंदाजी शैलीमुळे बुमराहला सातत्याने पाठीच्या दुखण्याने सतावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याच्या या दुखापतीने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. त्यामुळे त्याला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेततूनही माघार घ्यावी लागली. तसेच त्याची दुखापत गंभीर असल्याचेही सांगितले गेले. त्यामुळे आता या सर्वांबाबत गांगुली यांनी केलेले वक्तव्य दिलासा देणारे ठरत आहे.
येत्या दोन ते चार दिवसांत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) त्याची पुन्हा एकदा तंदुरुस्ती चाचणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.