भुलेश्वर- दिवसेंदिवस करोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंबळे (ता. पुरंदर) येथे रविवारी (दि. 12) व सोमवारी (दि. 13) एप्रिल रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या काळात हॉस्पिटल, मेडिकल दुकाने ही अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती सरपंच मंगेश गायकवाड यांनी दिली. करोनाचा विषाणू जर गावात आलाच नाही त्याला गावाच्या वेशी बाहेरच आडवले तर गाव सुरक्षित आणि गाव सुरक्षित तर देश सुरक्षित राहील.