मुंबई – अभिनेता अल्लू अर्जुन आपल्या चित्रपटांसह हटके स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध आहे. अल्लूचा पुष्पा चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर आता चाहते त्याच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. अशात तब्बल २० वर्षानंतर पुष्पा या चित्रपटाला नॉर्थ कडील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अल्लू चांगलाच भावून झाल्याचे दिसून आले.
दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ;इंडियन ऑफ द इयर २०२२’ या पुरस्काराने पुष्पाला गौरवण्यात आले. यावेळी अल्लू चांगलाच भावून झाला होता. तो म्हणाला,२० वर्षांच्या माझ्या करिअरमध्ये मला साऊथमध्ये अनेक पुरस्कार मिळाले परंतु उत्तरेतून पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ. ” तसेच आपल्यात साऊथ आणि नॉर्थ असं अंतर असलं तरी आपल्या देशाची सुंदरता ही विविधतेत आहे. म्हणून आपण सर्व भारतीय चित्रपट सृष्टीचे मुलं आणि मुली आहोत असं अल्लू यावेळी म्हणाला.
View this post on Instagram
यावेळी अल्लू अर्जुनने पुष्पा झुकेगा नही साला हा आपला डायलॉग मॉडिफाय करत ‘इंडियन सिनेमा… इंडिया कभी झुकेगा नही’ असा मारला. अल्लू लवकरच पुष्पाचा दुसरा पार्ट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. याचे शूटिंग देखील सुरु झाल्याची माहिती दिग्दर्शकाने दिली होती.