नवी दिल्ली – तीन अत्याधुनिक राफेल विमानांची शेवटची खेप भारताला मिळाली आहे. बुधवारी ही विमाने फ्रान्सहून भारतात आणण्यात आली. अशा प्रकारे आता भारताला सर्व 36 राफेल विमाने मिळाली असून फ्रान्सशी सात वर्षांपूर्वी झालेला यासंबंधीचा करार आता पूर्ण झाला आहे. या 36 पैकी 35 विमाने भारतात प्रत्यक्ष आणण्यात आली असून 1 विमान अद्याप फ्रान्समध्येच आहे. मात्र, ते भारतीय अधिकाऱयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राफेल विमानांमुळे भारताचे वायुदल अधिक सामर्थ्यसंपन्न झालेले आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
2016 मध्ये फ्रान्सच्या देसाँ कंपनीशी हा करार करण्यात आला होता. 59 हजार कोटी रुपयांना भारत फ्रान्सकडून ही 36 विमाने तयार स्थितीत घेणार असे ठरले होते. त्याप्रमाणे पूर्तता करण्यात आली आहे. ही विमाने देसाँ कंपनीने तयार केली आहेत.
राफेलचा प्रवास
– राफेल विमाने घेण्याचा निर्णय 2002 मध्ये
– 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काँगेसच्या काळात केवळ चर्चाच
– भारतीय वायुदलाला अतिशय आवश्यक असणाऱया या विमानांची खरेदी लांबली.
– 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्सच्या दौऱयात करार
– राफेल खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात या व्यवहाराविरोधात याचिका सादर
– अनिल अंबानी यांच्या कंपनीचा हजारो कोटी रुपयांचा लाभ झाला. असा आरोप
– . काँगेस नेते राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा देत व्यवहार संशयास्पद ठरविण्याचा प्रयत्न
– सर्वोच्च न्यायालयाची हे सर्व आरोप फेटाळले लावत व्यवहाराला मान्यता
– त्यानंतर विमाने भारतात येण्याचा मार्ग सुकर