आळंदी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. (१० वी) माध्यमिक परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी (२ जून) रोजी जाहीर करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा (आळंदी) निकाल ९९.६९% लागला आहे. सदर परीक्षेत एकूण ३२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये ३२३ विद्यार्थी पात्र झाले.
विद्यालयात सृष्टी जीवन पांचाळ या विद्यार्थिनीने – ४८५/५०० (९७.००%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. कृष्णा गणेश चव्हाण याने – ४७७/५०० (९५.४०%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर वेदांत रवींद्र भालेराव याने – ४७६/५०० (९५.२०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच दरवर्षीप्रमाणे दिव्यांग विभागाचा याही वर्षी १००% निकाल लागला असून त्यामध्ये पूजा विठ्ठल शिंदे या विद्यार्थिनीने ४०७/५०० (८१.४०%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला. विद्या भरत साबळे हिने – ४०१/५०० (८०.००%) व लक्ष्मी संतोष गीते हिने ४०१/५०० (८०.००%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर स्नेहल संजय कतरे हिने – ३९८/५०० (७९.६०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे, इयत्ता १० वीच्या समन्वयक अनिता गावडे, गुणवत्ता वाढ व विकास समितीचे प्रमुख नारायण पिंगळे व गुणवत्ता वाढ व विकास समितीचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व खजिनदार डॉ. दिपक पाटील यांनी सर्व संस्थेच्या वतीने व विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे व उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.