आळंदी – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील एकूण 197 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा 79.69% निकाल लागला आहे. त्यामध्ये विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 71.42% लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल 89.47% इतका लागला आहे.
त्यात विद्यालयाच्या कला शाखेत सोहम रामराव देशमुख याने 510/600 (85%) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभम हनुमंत राऊत याने 459/600 (76.50%) गुण मिळवून द्वितीय तर मुकुंद विठ्ठल इंगळे याने 401/600 (66.83%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच वाणिज्य शाखेत वैष्णवी पद्माकर मुळे या विद्यार्थिनीने 499/600 (83.17%) गुण मिळवून प्रथम क्रमांक, सविता पांडुरंग ढेंबरे या विद्यार्थिनीने 483/600 (80.50%) गुण मिळवून द्वितीय तर ज्ञानेश्वर बिरू घोडके या विद्यार्थ्याने 459/600 (76.50%) गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला.
या सर्व यशस्वी विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व विद्यालयाचे उपप्राचार्य व गुणवत्ता वाढ व विकास समितीचे पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे तसेच संस्थेच्या व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.