पातूर : तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी पाऊस होऊन चांन्नी येथे गारपीट झाली. त्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
चांन्नी येथे सुमारे १० मिनिटे गारपीट झाली. यामुळे गव्हाच्या परिपक्व झालेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. दाणे खाली पडून कोंब फुटण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कांदा, हरभरा या पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. देशात कोरोनाचे संकट असताना त्यात पुन्हा नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या रविवारी सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने शेती उद्योगाचे फार मोठे नुकसान झाले.