मुंबई – एप्रिल महिन्यापासून इंडियाच्या वैमानिकाच्या पगारात कपात करण्यात आली आहे. वेळोवेळी विनंती करूनही पगारात वाढ न केल्याबद्दल वैमानिकाच्या संघटनेने निर्गुंतवणूकिच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचे ठरविले आहे.
सर्व वैमानिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ नये असे या संघटनेने वैमानिकांना कळविले आहे. एप्रिल महिन्यात बहुतांश विमान कंपन्यांनी वैमानिकाच्या पगारात कपात केली होती. आता इतर कंपन्यांनी पगारात वाढ केली आहे. मात्र ऐअर इंडियाने पगारात वाढ करणे टाळले आहे.
प्रायव्हेट इक्विटीच्या सहकार्याने वैमानिकांची संघटना एअर इंडियाच्या खरेदीसाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलले जाते. त्यासाठी प्रत्येक सदस्य एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले जाते. बोली बोलण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर आहे.