संगमनेर – आळंदीकडे निघालेल्या शिर्डी येथील दिंडीला झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याबरोबर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी भेट घेऊन दिलासा दिला.
आळंदी यात्रेकरिता शिर्डी येथून निघालेल्या दिडींला संगमनेर तालुक्यात अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या जखमींना विखे पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून दिलासा दिला. या सर्व संकटात आम्ही तुमच्यासमवेत आहोत. कोणतीही काळजी करू नका, असा आधार त्यांनी दिला. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या घरी विखे पाटील यांनी भेट देऊन या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. या वेळी इंदोरीकर महाराज देखील उपस्थित होते.