पुसेसावळी – वर्धन अॅग्रो कारखान्याला 1 डिसेंबरपासून ऊस पुरवठा करणार्या शेतकर्यांना प्रतिटन 3111 रुपये अंतिम दर आणि मालकतोडीने येणार्या उसाला प्रतिटन 4111 रुपये अंतिम दर देण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस ज्येष्ठ संचालक भीमरावकाका पाटील, संपतराव माने, भीमराव डांगे, सुदाम दीक्षित, सत्वशील कदम, सुनील पाटील, दीपक लिमकर, यशवंत चव्हाण, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, सतीश सोलापुरे, दत्तात्रय साळुंखे, संतोष घाडगे, शरद चव्हाण उपस्थित होते. धैर्यशील कदम म्हणाले, कारखान्यात आजपर्यंत गाळपासाठी आलेल्या उसाची बिले वेळेत शेतकर्यांना वितरीत केली आहेत.
1 डिसेंबरपासून येणार्या उसाला प्रतिटन 3111 रुपये, तर मालकतोडीने येणार्या उसाला तोडणी, वाहतूक कमिशनसह 4111 रुपये अंतिम दर देण्यात येणार आहे. या उसाची बिले पंधरा दिवसांत शेतकर्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात येतील. कारखाना परिसरातील सर्व सभासद शेतकर्यांनी, ऊस पुरवठादारांनी आपला ऊस वर्धन कारखान्यास जास्तीत जास्त प्रमाणात द्यावा.
कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, कारखान्याने शेतकर्यांना उच्चतम ऊसदर देण्याचे धोरण अवलंबले आहे. सहवीज प्रकल्प नसतानासुद्धा कारखान्याने उच्चांकी दर जाहीर केला आहे. हा दर 1 डिसेंबरपासून देण्यात येणार आहे.