कोपरगाव – मागील पाच दशकांपासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती , ती प्रतीक्षा, तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावांतील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जाऊन दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाली, याचे मोठे समाधान वाटत असल्याचे उद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले.
कोपरगाव मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव येथील पाझर तलाव, बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी स्वत: जातीने उभे राहून आ.आशुतोष काळे यानी हे बंधारे निळवंडेच्या डाव्या कालव्यातून भरून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावांची पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण दूर झाली आहे. त्याबद्दल या गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करून त्यांचा जाहीर सत्कार केला, याप्रसंगी ते बोलत होते.
आ. आशुतोष काळे म्हणाले की, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी बंधाऱ्यात कसे आले, ओढे, नाले कसे भरले हे जनतेला माहीत आहे. मात्र, ज्यांचे यासाठी कोणतेही योगदान नाही ते मात्र काहीही न करता भाषण ठोकून नेहमीप्रमाणे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनता मात्र सुज्ञ आहे. पालक मंत्र्यांना भेटून दीड टीएमसी पाणी वाढवून घेतले.त्यामुळे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न टप्याटप्याने मार्गी लागत आहे.
यावेळी सुनील शिंदे, कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, किसनराव पाडेकर, बाबुराव थोरात, गजानन मते, बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, वेसच्या सरपंच जया माळी, अंजनापुरच्या सरपंच कविता गव्हाणे, नंदकिशोर औताडे, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, युवराज गांगवे, रंगनाथ गव्हाणे, चांगदेव शिंदे, ज्ञानेश्वर गव्हाणे, कृष्णा गव्हाणे, निवृत्ती गव्हाणे, संतोष वर्पे, अशोक गव्हाणे, नजीर इनामदार, शाहरुख सय्यद, आनंदा भडांगे, ज्ञानेश्वर वाघ, संतोष भडांगे, अजय शेळके, प्रमोद गोसावी, हारूण इनामदार, दामू गोसावी, महंमद इनामदार, दत्तात्रय गांगवे, नारायण गोसावी, तुषार गोसावी, अरुण कोल्हे, गोवर्धन गांगवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.