पानिपत – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संरक्षण दलांमधील भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या योजनेने तरूणांचे स्वप्न उद्धवस्त केल्याचा आरोप राहुल यांनी केला.
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून मार्गक्रमण करत आहे. त्या यात्रेचा भाग असणाऱ्या पानिपतमधील सभेत राहुल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने तरूणांना रोजगार पुरवण्याचे दिलेले आश्वासन मोडले.
अग्निपथ योजना येण्याआधी संरक्षण दलांमध्ये भरती होणाऱ्यांना सेवाकाळ आणि निवृत्तीवेतनाविषयी चिंता वाटत नव्हती. आता अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची अल्प मुदतीसाठी भरती होईल. केवळ 25 टक्के अग्निवीरांना संरक्षण दलांमध्ये पुढील सेवेसाठी सामावून घेतले जाईल.
Kerala : 24 तासांत 5 अवयवांचे प्रत्यारोपण; विशेष म्हणजे पाचही शस्त्रक्रिया…
इतरांपुढे बेरोजगारीचा प्रश्न उभा ठाकेल. संरक्षण दलांमध्ये भरती होऊ इच्छिणारे अनेक तरूण मला यात्रेदरम्यान भेटले. त्यांनी स्वप्न उद्धवस्त झाल्याची आणि भवितव्य अनिश्चित बनल्याची भावना व्यक्त केल्याचे राहुल यांनी म्हटले. अग्निपथ योजना आणणारेच माझ्यावर लष्कराविरोधात बोलत असल्याचा आरोप करत आहेत. खरेतर, मी लष्कराविषयी आदरानेच बोलत आहे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले..