मुंबई – शाहरुख खान आणि अजय देवगणनंतर आता तिसरे नाव पान मसाल्याच्या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. यावेळी अक्षय कुमारने पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रमोशन सुरू केले आहे. त्यामुळे आता अक्षय चांगलाच अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमारने टीव्हीवर ‘बोलो केसरी..’ बोलल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाचे माजी प्रमुख पहलाज निहलानी यांनी अक्षयच्या कृतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
त्यानंतर काल अक्षयने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहत माफी मागितली आहे. या जाहिरात मध्ये अक्षय सोबत अजय देवगण आणि शाहरुख खान देखील दिसले होते. मात्र, आता या प्रकरणावर अजयने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजय देवगने आपले वैयक्तिक मत स्पष्ट केलं आहे.
यावेळी अजय म्हणाला की… ‘असे काही प्रोडक्ट्स आहेत जे हानिकारक आहेत आणि काही नाहीत. मी त्याचे नाव घेणार कारण मला त्याचा प्रचार करायचा नाही. मी वेलचीची जाहिरात करतो. मी जाहिराती पेक्षा हा विचार करतो की, जर कोणती वस्तू इतकी वाईट आहे तर त्याची विक्री व्हायला नको. एखाद्या गोष्टीची जाहिरात करणे हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. प्रत्येकजण स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम आहे.’ असं तो म्हणाला.
दरम्यान, लवकरच अभिनेता अजय देवगनाचा आगामी ‘रनवे 34’ हा चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय सोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आणि याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजय देवगनला या जाहिराती संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले होते.