वाराणसी – सर्व धर्मांचे गंतव्यस्थान म्हणजेच उद्दीष्ठ एकच आहे. रस्ते कदाचित वेगवेगळे असले तरी त्यांचे उद्दीेट समान आहे. त्यामुळे वसुधैव कुटुंबकम पद्धतीने सर्वांनी बंधुभाव जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
वाराणसीच्या त्यांच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान, आज त्यांनी जगंबरी मठ येथे आयोजित वीर शैव संमेलनात श्री काशी पीठाचे 87 वे जगद्गुरू म्हणून डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामींच्या पट्टाभिषेक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, भारतात विविध धर्म, पंथ आणि समुदाय आहेत.या साऱ्यांचे उद्दीष्ट एकसमान आहे. आपण सर्वांनी नेहमी धर्माच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. जेव्हा एखादे राष्ट्र बलवान असते, तेव्हा त्याचा धर्मही बलवान असतो असेही ते म्हणाले. एक भारत श्रेष्ठ भारत अभियानामध्ये सर्वांना सामील व्हायला हवे यावर आदित्यनाथ यांनी भर दिला.