शिरूर तालुक्याच्या राजकीय व्यक्तिरेखांचा अभ्यास करता प्रामाणिक, शांत, संयमी, सुसंस्कृत, कल्याणकारी, सुशील व सृजनशील आणि सर्वसामान्यांच्या सेवेस सदैव तत्पर असलेले नेतृत्व म्हणजे टाकळी हाजी गावच्या कार्यक्षम विद्यमान सरपंच सौ. अरुणाताई दामूशेठ घोडे. कुठलीही सत्ता हाती नसताना शिरूर तालुक्याच्या राजकारणात सातत्याने पाय रोवून खंबीरपणे उभे राहात राजकारणात प्रवेश करून गावचे सरपंच, शिरूर पंचायत समितीच्या कार्यकुशल, प्रतिभावंत सदस्या अशी ओळख अरुणाताई यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा घेतलेला आढावा….
अरुणाताई यांचे पती आदर्श सरपंच दामूशेठ ऊर्फ दामूअण्णा घोडे यांच्या साथीने जनसेवेचा वसा आणि वारसा जपत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून घेत सरपंचपदी विराजमान होण्याचा दुसऱ्यांदा बहुमान अरुणाताईंना मिळाला आहे.
शब्दचातुर्यात वाकबगार असलेल्या अरुणाताईंनी आदर्श सरपंच दामूअण्णा घोडे यांच्या शिकवण आणि संस्काराच्या जोरावर गेली वीस वर्षे ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून केलेले काम आकाशाला गवसणी घातल्यासारखे आहे. बेट भागामध्ये दांडगा जनसंपर्क, माणसं जोडण्याची कला, यातून त्यांना मिळालेला आशीर्वाद हेच त्यांचे यशाचे खरे गमक आहे. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकदा त्यांच्या विचारांशी जोडलेला माणूस शक्यतो दूर जात नाही. सर्वसामान्यांच्या लहान-मोठ्या समस्या सोडवणे हे त्यांनी आजन्म अंगीकारलेले व्रतच जणू.
अरुणाताई यांना राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे पती दामूशेठ गावचे सरपंच होते. तेव्हापासूनच या दाम्पत्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा खर्च करून, प्रत्येकाच्या सुख-दुःखात हिरीरीने सहभाग घेतला. म्हणूनच त्यांच्याभोवती भविष्यात वेळ आल्यावर जनतेचा महापूर लोटेल, यात नवल वाटण्याचे अजिबात कारण नाही. राजकारण बाजूला ठेवून बेट भागातील सर्वसामान्यांच्या हृदयात मिळवलेली जागा कायम निर्विवाद राहील, अशा लोककल्याणकारी व सह्याद्रीच्या उंचीची वैचारिक स्पर्धा करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे म्हणजे हाती शिवधनुष्य पेलण्याइतकं जिकिरीचे आहे. त्यातही त्यांचा कार्यकर्तृत्वाचा आलेख हा जनसामान्यांसाठी एक विकासाचा परिस असेल.
दामूअण्णा घोडे म्हणजे गावातील सत्ता जरी असली तरी सत्तेची घमेंड नाही, पदाचा गर्व नाही, सदाचारी जीवन, अहंकाराला थारा नाही. पद, प्रतिष्ठा, संपत्तीची आस नाही. मनात कधीच कुणाविषयी तिरस्कार नाही. वीस वर्षे टाकळी हाजीच्या सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा लोकांच्या मनात राज्य करणारा आदर्श सरपंच. वैभवशाली आणि गौरवशाली विचारांची परंपरा ज्यांनी निर्माण केली. समाजोपयोगी आणि समाजसेवी लोकाभिमुख लोकनेत्यास जनतादेखील एखाद्या श्रीकृष्णासारखं साथ द्यायला तयार आहे.
बेट भागाच्या रणरागिणी, आदर्श भगिनी, कधी पंचायत समिती सदस्या तर कधी आदर्श सरपंच. काम करायला पदच लागते असं नाही तर मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि गरिबांविषयी तळमळ लागते, हे ताईनी दाखवून दिले आहे. ताईंची समाजाविषयी असणारी आस्था गरिबांविषयी असणारे प्रेम हे ठाई ठाई जाणवते.
सत्य सांगण्यासाठी कुठल्याही शपथेची गरज नसते. जे आपल्या हिमतीवर जीवन जगतात. त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. अशा धाडसी पण तितक्याच शांत, सुशील, प्रतिभावंत, महिला नेतृत्व अर्थात पंचायत समिती सदस्या व विद्यमान सरपंच सौभाग्यवती अरुणाताई घोडे. एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व, निर्भिड वैचारिक शैली, उत्तम संघटक, आदर्श नेतृत्व, प्रशासनाची उत्तम जाण अशा अनेक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
सरपंच अरुणाताई घोडे यांना त्यांचे पती दामूशेठ घोडे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, आमदार अशोक पवार यांनी विकासकामे करताना मोलाचे मार्गदर्शन करून टाकळी हाजीत विकास निधी देण्यासाठी मदत केली आहे. अरुणाताई यांना जिल्हा परिषदेचे माजी सीईओ प्रभाकर गावडे, चेअरमन बन्शी घोडे, व्हाईस चेअरमन साहेबराव लोखंडे, सावित्रा थोरात, अशोक मेचे, नारायण कांदळकर, विलास घोडे, फकिरा घोडे, रामदास सोदक हे भक्कम साथ देत आहेत.
अरुणाताई घोडे यांना उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, अनिता जाधव, भरत खामकर, अर्जुन खामकर, प्रियंका दिवेकर, पुष्पा थोरात, प्रियांका बारहाते, बाबाजी साबळे, विलास साबळे, मनीषा घोडे, पारूबाई माळी यांची विविध विकासकामे करताना साथ मिळत आहे.
करोना काळात मायेची सावली
शिरूर बेट भागातील जनतेच्या सेवेसाठी अरुणाताईंचे सासरे आणि दामूअण्णाचे वडील स्व. धोंडीबा घोडे यांच्या स्मरणार्थ स्वतः रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. करोना काळात जनतेसाठी केलेली मदत, अशी कोट्यवधींची कामे करूनही कधीच श्रेयाची अपेक्षा न करता जनसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारून कार्यालयात किंवा घरात बसून जनतेची सेवा होत नाही. त्यासाठी जनमाणसांच्या हाकेला धावून जाणे हा महामंत्र घेऊन विकासाचा महामेरू, बहुजनांचा आधारवड म्हणून बेट भागात दामूअण्णा घोडे प्रतिष्ठानच्या रूपाने प्रत्येक घरात पोहोचलेले म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे.
समाज हेच कुटुंब
समाज हेच कुटुंब मानून सेवा करीत असताना स्वतःच्या कुटुंबातील अण्णांच्या मोठ्या भावाचे आणि परिवाराचे योगदान आणि साथ ही वाखाणण्याजोगी आहे. वडील स्व. धोंडीबा ऊर्फ धोंडूशेठ, आई (स्व) हौसाबाई, सुगंधाबाई, मोठे बंधू कोंडीभाऊ, वहिनी विमल, पुतणे विक्रम आणि दीपक, सुनबाई ग्रामपंचायत सदस्या मनीषा आणि सोनल, मुले डॉ. शुभम आणि शेखर या सर्वाची साथ मोलाची आहे. दानशूर, कर्तृत्ववान, कार्यक्षम, उत्तम राज्यकर्त्या म्हणून टाकळी हाजीच्या विकासात अरुणाताई आणि दामूअण्णा यांचे नाव सर्वांच्या मुखात अग्रभागी राहील.
पाणीप्रश्न, सुरक्षेला प्राधान्य
दाम्पत्याचे सरपंचपदाच्या प्रदीर्घ कालावधीत जिल्ह्यातील सर्वाधिक घरकुले मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे. गावातील सिमेंट रोड, पाणीपुरवठा योजना, गटारी योजना, गावामध्ये सीसीटीव्ही बसविणे, वाडी वस्त्यांवर पाणंद रस्ते बनविणे, शाळा, सामाजिक सभागृह, आरओ प्लांट आदी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.
संकलन – अरुणकुमार मोटे, सविंदणे