मुंबई – अभिनेत्री सोनम कपूरने आनंद आहुजासोबत विवाह केल्यानंतर आपल्या कुटुंबावर पुनर्तहा लक्ष केंद्रीय केले. यासाठी सोनमने चित्रपटांमधून ब्रेक देखील घेतला. सध्या सोनम आपल्या एका ट्विटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोनमने केलेले हे ट्विट मुंबईबाबतचे असल्यामुळे अनेकांनी दिला याबाबत रिप्ले देखील दिला आहे.
मुंबई आणि ट्राफिक हे आता एक समीकरणच बनलं आहे. असं असाल तरी क्वचितच मुंबईकर याबाबत भाष्य करतात कारण त्यांना आता याची जणू सवयच होऊन गेली आहे. सोनमने देखील मुंबईच्या ट्राफिकबाबत असाच एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये सोनम म्हणते,”मुंबईतून गाडी चालवणे खूप कठीण आहे,जुहू ते बॅण्डस्टॅण्ड पोहचायला मला एक तास लागला,सर्वत्र बांधकाम आणि खोदकाम,प्रदूषण सुरु होत. हे नेमकं काय चालू आहे ?” असं ट्विट सोनमने केलं. त्यानंतर मात्र तिच्यावर कमेंटचा अक्षरशः पाऊस सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
It’s torturous to drive through mumbai. It’s taken me an hour to reach bandstand from Juhu. Too much construction and digging everywhere. Pollution is through the roof. What’s going on.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 14, 2023
नेटकऱ्यांनी आणि मुंबईकरांनी सोनमला चांगलाच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पाप की परी हो उड के जाओ’ अशी कमेंट एका युजरने केली आहे तर दुसऱ्याने मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याचा सल्ला सोनमला दिला आहे.तर आणखी एकाने आता दिल्लीवाले सुद्धा मुंबईतील प्रदूषणाबाबत बोलू लागलेत अशी कमेंट केली आहे. लवकरच सोनम मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ब्लाइंड नावाचा सोनमचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.