मुंबई – टीव्हीमुळे घराघरात फेमस झालेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर उर्फ राणा दा आणि पाठक बाई सध्या लंडनमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताहेत. तुझ्यात जीव रंगलामधील ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. म्हणूनच दोघेही एकमेकांना वेळ देत विदेशात आपल्या सुट्या घालवताहेत.
लंडनच्या भर रस्त्यात पाठकबाईंनी थेट राणादा ची कॉलर पकडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तुम्हाला वाटत असेल या दोघांमध्ये काही वाद वेगैरे झाला की काय ? पण असं काही नाही इतर व्यक्तींप्रमाणे या दोघांनी देखील एक रील बनवली आहे. जी त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होतेय.
व्हिडीओत हार्दिक नितीश चव्हाणला म्हणतो, बघ मित्रा पितळेला घासून ते कधीच सोनं बनू शकत नाही. त्यावर नितीश चव्हाण तुम्ही असं का म्हणता? असे विचारतो. त्यावर हार्दिक म्हणतो कारण माझी बायको ही ब्युटी पार्लरमध्ये गेली आहे. हार्दिकचे हे वाक्य अक्षया ऐकते आणि ती चांगलीच भडकते आणि राणाची कॉलर पकडते.
View this post on Instagram
तुझ्यात जीव रंगला ही सीरिअल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्यामुळे फॅमिली ऑडियन्समध्ये राणा आणि पाठक बाईंचे भरपूर फॅन्स आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत कमेंट देखील केल्या आहेत. अभिनेत्री अक्षयाने दिलेलं ‘हिम्मतवाला’ कॅप्शन देखील अनेकांना चांगलंच आवडलं आहे. हार्दिक आणि अक्षयाचा साखपुडा झालेला पार पडलेला आहे त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.