मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:
- राधाकृष्ण विखे-पाटील (महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास)
- सुधीर मुनगंटीवार ( वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय )
- चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य)
- डॉ. विजयकुमार गावित (आदिवासी विकास)
- गिरीष महाजन ( ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण)
- गुलाबराव पाटील ( पाणीपुरवठा व स्वच्छता)
- दादा भुसे (बंदरे व खनिकर्म)
- संजय राठोड (अन्न व औषध प्रशासन)
- सुरेश खाडे (कामगार)
- संदीपान भुमरे (रोजगार हमी योजना व फलोत्पादन)
- उदय सामंत (उद्योग)
- प्रा.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण)
- रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण)
- अब्दुल सत्तार (कृषी)
- दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा)
- अतुल सावे (सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण)
- शंभूराज देसाई (राज्य उत्पादन शुल्क)
- मंगलप्रभात लोढा (पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास)