नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत देशांत तब्बल 49 हजार 311 बाधितांची नोंद केली गेली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 12 लाख 87 हजार 945 वर पोहोचल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले.
महाराष्ट्रात तीन लाख 47 हजार 502 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील एक लाख 94 हजार 253 बाधित बरे झाले असून 12 हजार 854 मरण पावले आहेत. सध्या सक्रिय बाधितांची संख्या एक लाख 40 हजार 395 आहे. त्या पाठोपाठ तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.
दिल्लीत एक लाख 27 हजार 364 तर तामिळनाडूत एक लाख 92 हजार बाधित आहेत. गुजरातमध्ये 52 हजार 477
बाधित आहेत.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेश, बिहार, तेलंगंणा, ओडिशा, प. बंगाल, आसाम, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून करोना नियंत्रणाबाबत सूचना केल्या.