मांडवगण फराटा – लग्नाहून माघारी परत गावी जाताना विवाहितेचे 15 तोळे सोने व रोख रक्कम गहाळ झाली होती; मात्र प्रामाणिकपणे एकाने सर्व दागिने व रोख रक्कम संबंधित महिलेला माघारी माघारी दिले असून या प्रामाणिकपणाची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
अनिता संदीप येचकर (रा. पांढरेवाडी, ता. दौंड) यांचे माहेर गणेगाव दुमाला (ता. शिरूर)येथील असून त्या लग्नानिमित मांडवगण फराटा येथे आल्या होत्या. येथून त्या माघारी कानगावकडे जात असताना रस्त्यात त्यांचे जवळ असणारे सुमारे 15 तोळे दागिने तसेच रोख रक्कम असलेली पर्स ही प्रवासात गहाळ झाली.
काही अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. यावेळी त्यांनी लगेचच शोधाशोध सुरू केली. दरम्यान ऋषिकेश कदम यांना रस्त्याच्या कडेला पर्स आढळून आली. यावेळी त्यांनी पर्समध्ये असलेला पत्ता शोधून लागलीच येचकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे जशीच्या तशी पर्स सुपूर्द केली. ऋषिकेश कदम यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.