कान्हे,(वार्ताहर) – पुणे मुंबई महामार्ग लगत असलेल्या नायगाव पेट्रोल पंप शेजारील ओढ्याला गटारीचे स्वरूप आले आहे. या ओढ्याशेजारील शेतकऱ्यांना डासाचा उपद्रव व दुर्गंधीमुळे या ठिकाणी ये जा करणारे नागरिक व शेतीसाठी काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नायगाव येथील पेट्रोल पंप समोजील वाहणाऱ्या ओढ्यात काही नागरिक कचरा टाकतात. त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे ओढ्या शेजारील शेतकऱ्या या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कामशेत परिसरातील हॉटेल व्यावसायिक येथील ओढ्यात हॉटेलमधील शिल्लक शिळे अन्न टाकतात. ओढ्यातील दूषित पाणी शेतात जाते. त्यामुळे शेतात काम करताना त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
हे ओढ्याची दुर्गंधीयुक्त पाणी इंद्रायणी नदीत जाते. त्यामुळे नदीही प्रदुषित होते. दूषित पाण्यामुळे नदी पात्रात मासे मरून पडल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत.
सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक
गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते ओढ्यात सोडून दिले जाते. त्यामुळे बाराही महिने सांडपाणी वाहते. सांडपाण्यावर प्रकिया करणे आवश्यक आहे.
कामशेत परिसरातील गटारीचे पाणी ओढ्यामध्ये सोडण्यात येत आहे. तसेच चिकन व्यवसाय या ओढ्यामध्ये चिकनचा कचरा टाकतात. त्यामुळे या ओढ्यामधून प्रचंड दुर्गंधी येते. – महेश चौधरी, पोलीस पाटील, नायगाव
नायगाव पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ओढ्या शेजारील शेतजमिनीत काम करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात हे पाणी शेतामध्ये येते. त्यामुळे भात पिकाचे नुकसान होत आहे.- लहु चोपडे, शेतकरी, नायगा