गडचिरोली – गडचिरोलीतील कसनेलीच्या जंगतलात c -60 जवान आणि माओवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह दोन पुरूष माओवाद्यांचा समावेश आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.
माओवादी आणि c-60 कमांडो यांच्यात अजूनही चकमक सुरू आहे. तर दुसरीकडे तेलंगणात देखील चकमक सुरू असून तेथे दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मागील महिन्यात रविवारी (15 सप्टेंबर) देखील गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. तेंव्हा दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.