नवी दिल्ली – शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये गेल्या 70 वर्षांपासून गुंतवणूक आहे. मात्र, या दोन उद्योगसमूहातील संबंध गेल्या काही वषापासून बिघडत चालले आहेत. टाटा समूहापासून वेगळे होण्याची वेळ आली आहे, असे शापूरजी पालोनजी समूहाने म्हटले आहे.
टाटा सन्समध्ये शापूरजी पालोनजी समूहाची 18.37 टक्के इतकी गुंतवणूक आहे. यातील काही शेअर गहाण ठेवून शापूरजी पालोनजी उद्योगसमूहाने भांडवल उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, टाटा समूहाने याला सर्वोच्च न्यायालयात हरकत घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाची बाजू योग्य असल्याचे सांगितले आहे.
शापूरजी पालोनजी समूहाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्हाला आता टाटा समूहपासून वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. शापूरजी पालोनजी समूहावर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. त्यासाठी भांडवल उभारण्याची गरज आहे.