शेवगाव- करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शेवगावातील विविध स्थरातील व्यावसायिक आणि करोना ग्राम सुरक्षा समितीने प्रशासनाच्या उपस्थितीत घेतलेल्या चार दिवसीय ‘जनता कर्फ्यूच्या निर्णयास नागरिकांनी आज पहिल्या दिवशी सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८१९ वर पोहचली आहे. त्यातील १८४ रुग्णांवर उपचार सुरु असून ६२६ जणांनी करोना आजारावर मात केली आहे. तर नऊ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जनता कर्फ्यु पाळण्यात यावा अशी आग्रही मागणी जनतेतूनच होत होती. शेवगाव शहरात, बाजार पेठेत, विविध उपनगरात व कार्यालयात करोनाची लागण झाली आहे.
काही व्यावसायिकाचे संपूर्ण कुटूंब बाधित झाल्याने व्यावसायिकांना ही साखळी तोडण्याची जाणीव झाली. या व्यावसायिकांनी तसेच करोना ग्राम सुरक्षा समितीच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा राणी मोहिते, तहसीलदार अर्चना पागिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव ढिकले ,नगरसेवक, विविध संघटना, पक्षांचे जबाबदार पदाधिकारी यांचे उपस्थितीत सर्वानुमते करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गुरुवार पासून रविवार ( दि९ ते१३ ) पर्यंत चार दिवस शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता .
सर्वसामान्यांनाना करोना महामारीने शेवगावात घातलेल्या थैमानाची माहिती देत नागरिकiनी हा जनता कर्फ्यू काटेकोरपणे पाळावा असे अTवाहन काल मंगळवारी दिवसभर शहरात रीक्षा फिरवून करण्यात आले . त्याला सजग नागरिकांनी साथ दिली .नागरिकांनी दिलेल्या साथीबद्दल नगराध्यक्षा राणी मोहिते यांनी तसेच पंचायत समितीचे सभापती डॉ .क्षितीज घुले यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.