करवीर तालुक्यातील कुरुकली मधील घटना
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्याच महिन्यात शेतीच्या किरकोळ वादातून एका युवकाचा बळी घेल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यात सुद्धा आता शेतीच्या किरकोळ वादवादीतून एका 30 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे .
किशोर उर्फ काशीनाथ सत्ताप्पा पाटील (रा. कुरुकलीझ ता. करवीर) असे या मृत युवकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी गावातील एका किरण नावाच्या तरुणासोबत किशोरची किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती आणि तोच राग डोक्यात ठेवून किरणने किशोर चा कोयत्याने सापसाप वार करून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत किशोर आणि संशयित आरोपी किरण दोघेही कुरुकली गावचेच रहिवाशी. यांच्यात शेतातील गवत कापण्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयाजवळील रस्त्यावरच किशोरचा मानेवर वार करून संशयित किरणने निर्घृण हत्या केली. स्वतः किरणने पोलीस ठाण्यात हजर होऊन याबाबत माहिती दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
खरंतर गेल्याच महिन्यात अशा प्रकारची घटना घडली होती. त्यात आता पुन्हा त्याच किरकोळ कारणावरून जिल्ह्यात दुसरी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, यांच्यासह पोलिस दाखल झाले असून ते अधिक तपास करत आहेत.