पिरंगुट – भूगाव (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांसाठी वरदान ठरलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशय शंभर टक्के भरला आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी जलपूजन करून आनंद व्यक्त केला.
भूगाव आणि भुकूम गावाच्या वेशीवर राम नदीवर हा जलाशय आहे. यामुळे घरगुती व शेतीच्या वापरासाठी येथील पणायाचा वापर केला जातो. यावर्षी पावसाने उशीर लावल्याने जलाशयाची पातळी खाली गेली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हा जलाशय शंभर टक्के भरला आहे. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी या जलाशयातून जवळपास दोन हजार ट्रक गाळ काढला आहे, त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तलाव पूर्ण भरल्याने भूगावकरांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, सरपंच निकिता सणस, उपसरपंच विशाल भिलारे, अनिल पवार, रमेश सणस, जीवन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.