नवी दिल्ली :- पी-नोट्च्या माध्यमातून जूनपर्यंत 62,138 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे सेबीच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जून या काळात गुंतवणूकविषयक परिस्थिती चांगली नसतानाही परदेशातील गुंतवणूकदारांनी मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दर्शविला आहे असे यातून दिसून येते.
गेल्या तीन महिन्यांपासून पी नोट्सच्या माध्यमातून शेअरबाजारातील गुंतवणूक वाढत आहे. अगोदर मात्र ही गुंतवणूक कमी होत हाती. भारत सरकारने जाहीर केलेले पॅकेज आणि इतर उपाययोजनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढत चालला असल्याचे यातून दिसून येते.