आळंदी -गेल्या 15 दिवसांपासून आळंदीत करोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दि. 13 ते 27 जुलैदरम्यान लॉकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे रविवारी (दि. 12) खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले आहे.
आळंदीत तब्बल 15 दिवसांचा लॉकडाऊन पुकारल्याने रविवारी किराणा दुकाने, भाजी मंडई व इतर अत्यावश्यक सेवेसाठी असणारी दुकाने, मद्य, मांसविक्री याठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.