लखनौ – सन 2022 साली उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांमधे प्रियांका गांधी याच पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी दिली. या निवडणुकीत आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी आघाडी करणार नाही अशी घोषणाही त्यांनी करून टाकली आहे.
आमची आघाडी ही केवळ युवक, शेतकरी, गरीब, दलित आणि उपेक्षित समाजाशी असेल असे ते म्हणाले. प्रियांका गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उत्तरप्रदेशशी पिढीजात नाते असून या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली आहे असे त्यांनी नमूद केले.
प्रियांका गांधी यांच्याच देखरेखेखाली उत्तप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार चालले पाहिजे, अशी येथील जनतेची भावना असल्याचे त्यांनी आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.