पाटणा/ नवी दिल्ली – भारत-नेपाळ सीमेजवळ नेपाळ बॉर्डर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आणि दोनजण जखमी झाले. ही घटना नेपाळच्या सीमेला चिकटून असलेल्या बिहारच्या सितामथी जिल्ह्यापासून काही अंतरावर नेपाळच्या हद्दीमध्ये सकाळी 8.40 वाजता घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी लगान यादव या भारतीय नागरिकाला नेपाळ बॉर्डर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
या प्रकरणी सशस्त्र सीमा बलाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नेपाळच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. स्थानिक नागरिक आणि नेपाळच्या आर्म्ड पोलीस फोर्स दरम्यानच्या संघर्षातून ही घटना घडली, असे “एसएसबी’चे पाटणा विभागाचे महानिरीक्षक संजय कुमार यांनी सांगितले. नेपाळच्या “एपीएफ’ने केलेल्या गोळीबारात एक जण ठार आणि दोघेजण जखमी झाले, असेही त्यांनी सांगितले. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विकेश यादव असून उदय ठाकूर आणि उमेश राम अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पाटण्यापासून 85 किलोमीटर अंतरावरील सितामर्थी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या सीमा भागात कुंपण घातलेले नाही. तसेच काही नागरिकांचे नातेवाईक सीमेच्या पलिकडे रहात आहेत. प्राथमिक माहितीनुसार लगान यादव याची सून काही भारतीयांशी बोलत असल्याचे नेपाळच्या “एपीएफ’च्या कर्मचाऱ्यांनी बघितले. या बोलण्याला त्यांनी आक्षेप घेतल्यावर त्या ठिकाणी 75-80 भारतीय जमा झाले. या जमावाला हुसकावून लावण्यासाठी “एपीएफ’ने प्रथम हवेत गोळीबार केला. जमावाकडून बंदुका हिसकावून घेतली जाण्याची भीती असल्याने गोळीबार करावा लागला, असे