नगर -लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचा विडी उद्योगावर परिणाम झाला असून हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. या व्यवसायावर अवलंबून आलेल्या अनेक विडी कामगार महिलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे या महिलांना केंद्र व राज्य सरकारने तेलंगणा राज्याच्या धर्तीवर दोन हजार रुपये जीवन भत्ता द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केली आहे. याबाबत जाधव यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना पत्र पाठविले आहे.
विडी व्यवसाय बंद असल्याने या कामगारांना उत्पन्नाचे साधनच बंद पडले आहे. त्यामुळे त्यांची उपासमार रोखण्यासाठी दोन हजार रुपये भत्ता देण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.