नागपूर – महामार्ग आणि वाहतूक खुली करण्याने नागरिकांचा विश्वास वृध्दींगत होऊ शकतो, त्यामुळे देशात पहिला लॉक डाऊन जाहीर केल्यापासून म्हणजे 24 मार्चपासून सार्वजनिक वाहतुकीवर असणारी बंदी लवकरच उठवली जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
बस आणि कार व्यावसायिकांच्या संघटनेशी गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, महामार्ग आणि वाहतूक सुरू होणार असली तरी हॅंडवॉश, सॅनिटायझेशन, फेस मास्क आदींसारख्या सुरक्षेच्या उपाय योजनांचे पालन करावे लागेल. देश आणि उद्योग जगत एकत्र येऊन करोना आणि आर्थिक मंदीचे युध्द जिंकतील असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
करोनाच्या साथीमुळे 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्याची अंमलबजावणी करणे आवश्यकच आहे. त्याकाळात रेल्वे आणि विमानसेवा बंदच राहणार आहे. मात्र तरीही स्थलांतरीत मजुरांसाठी 100 श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.
व्यावसायिकांच्या मागण्या
कर्जाच्या रकमेवरील व्याहात सवलत मिळावी, सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, बसच्या आयुच्याची मर्यादा वाढवावी, राज्य सरकारांचे कर कमी करावेत, विमा पॉलिसीच्या वैधतेला वाढ मिळावी.