राजगुरुनगर (प्रतिनिधी) : चाकण येथे कामासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील सुमारे 70 कामगार पुन्हा पायाने चालत मध्यप्रदेशातील घरी निघाले आहेत.
चाकणमध्ये मार्बल काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील १०० पेक्षा जास्त कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे हे कामगार (दि १६) मार्च रोजी माध्यप्रदेशातून चाकण येथे कामासाठी आले होते.चाकण कामगार नाक्यावरून ते मार्बल कामासाठी रोजंदारीवर चाकण एमआयडीसीत कामाला जात होते.
मात्र सुरुवातीला राज्यात संचार बंदी लागली त्यानंतर 25 मार्च पासून देशात संचार बंदी सह लॉकडाऊन सुरू झाल्याने चाकण एमआयडीसीत काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.कंपन्यांनी लॉकडाऊन केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांना राहण्यासाठी आणि जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे तर नाहीतच उलट त्यांना ते राहत असलेल्या खोल्या खाली करण्याचे खोली मालकांनी सांगितल्याने त्यांच्या पुढे मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.
कामही नाही आणि आता एका एका खोलीत राहणारे आठ दहा भैये आता हवालदिल झाले आहेत पुन्हा त्यांच्या गावाकडे जायला वाहने ट्रेन नसल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. उपासमारी, राहण्याला आधार नसल्याने कामासाठी आलेले यूपी बिहारी, एमपी,आदी राज्यातील हे कामगार आता पायी गावाकडे निघाले आहेत.
चाकण मध्ये टेल मार्बरमध्ये काम करणारे मध्यप्रदेशातील मुरेना गावामधील तब्बल ७० ते १०० जणांनी आज पायी चालत मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी चाकण मधून ४ वाजता आपल्या गावाकडील रस्ता धरला आहे. मध्यप्रदेशात आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले हे सुमारे १०० कामगारांची रस्त्याने जाताना स्थानिक नागरिकांडून पाणी, नाष्टा, व जेवणाची सोय केली जात आहे.
पोलिसांच्या मदतीने त्यांना या सुविधा सेवाभावी नागरिकांकडून केली जात असली तरी हे भैये करोना बाबत जागरूकता बाळगत नसल्याचे समोर आले आहे.जाताना बसताना जेवताना ते एकत्र बसत असल्याने करोना विषाणूंची लागण होण्याची भीती आहे.त्यांना त्यांच्या गावाला चालत पोहचायला तब्बल 15 दिवस लागणार आहेत.सुमारे 1200 किमी ट्रेन ने आलेल्या या कामगारांवर पुन्हा 1200 किमी अंतर पायी चालण्याची वेळ आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरून त्यांचा पायी प्रवास सुरू झाला आहे. एकूणच करोना विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन झाल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे.तर बाहेरगावच्या कामगारांचे मोठे हाल होत आहेत जे जथ्यांने आले ते परत निघाले असले तरी जे आपल्या कुटुंबसमावेत येथे कामासाठी आले आहेत त्यांचे मोठे हाल होणार आहेत.
दरम्यान मध्यप्रदेशात पायी चालत जाणाऱ्या या कामगारांना खेड पोलिसांनी चहा नाष्टाची सोय करून दिली त्यानंतर शहारातील सेवा भावी नागरिकांनी जेवणाची व्यवस्था करून दिली आहे जेवणानंतर त्यांनी त्यांच्या गावाचा रास्ता धरला.