नवी मुंबई : औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यातील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईत अशीच धक्कादायक घटना उघड झाली आहे. पनवेलमधील दुन्द्रे या गावात एका ५५ वर्षीय महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
शारदा माळी असे या मृत महिलेचे नाव आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी महिलेला फासावर लटकावून तिचा खून केला. या हत्या प्रकरणात पाच संशयित आरोपी असून सर्व फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र नातेवाईकांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज कडकडीत बंद पाळण्यात आला. पाळण्यात आला. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी नागरिकांमार्फत करण्यात येत असून, अनेक महिला रस्त्यावर निदेर्शने करीत आहेत.