मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बैठकीत इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेबाबतचे वेळापत्रक तसेच काही बदल निश्चित करण्यात आले. यंदाच्या स्पर्धेला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होत असून अंतिम सामना 24 मे रोजी अहमदाबाद नव्हे तर मुंबईत रंगणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर संघमालकांची सामना अर्धा तास आधी सुरू करण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.
मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा आणि अन्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. संघ मालकांना दिलासा देताना यंदा केवळ पाचच दिवस डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसरात्र सामना 8 वाजता सुरू होणार असून साडेसात वाजता सामना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली मात्र तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.