तंजावर – ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सज्ज अशी सुखोई-30 विमानांची पहिली तुकडी दक्षिण भारतात दाखल करण्यासाठी सज्ज झाली आहे. संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि हवाई दल प्रमुख आरकेएस भदोरीया यांनी विविधांगी उपयोगी लढाऊ विमानांची पहिली तुकडी पाठवण्याची तयारी पूर्ण केली आहे.
एसयु 30 एमकेआय लढाऊ विमानांची ही तुकडी सागरी मार्गावरही लक्ष ठेवेल. सुखोईच्या या सज्जतेमुळे भारतीय सामरिक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे, असे भदोरिया यांनी सांगितले. या तुकडीचे नाव टायगर शार्क असे ठेवण्यात आले असून हवाई दलाच्या तळावर सज्ज असेल. हिंदी महासागरात चीनी युध्द नौकांच्या वाढत्या अस्तित्वाला आव्हान देण्यासाठी हे पाऊल उचलले असे मानले जाते.
हिंदी महासागर हा अत्यंत मोठा असून तो तीन खंडाच्या सीमेला स्पर्श करतो. तेथील सुरक्षा व्यावस्था त्यामळेच देशासाठी महत्वाची आहे. भारतीय हवाई दल मुख्यत: सामरिक दल आहे. हिंदी महगासागराच्या प्रदेशात ते कोठेही पोहोचू शकते. अडीच टन वजनाच्या ब्राम्होस क्षेपणास्त्राची माऱ्याची क्षमता 300 किमीची आहे. ते कोणत्याही हवामानात वापरता येऊ शकते.