मान्यवर निदर्शनात सहभागी; झखमी विद्यार्थ्यामवरचदंगल घडवण्याचे गुन्हे
नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बुरखाधारी गुंडांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारीही देशव्यापी निदर्शने झाली. गुजरातमध्ये अभाविप आणि एनएसयुआय कार्यकर्त्यांत झालेल्या संघर्षात 10 जण जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या अध्यक्ष आयेषी घोष हिच्यासह 19 अन्य विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल केले. सीताराम येचुरी आणि प्रकाश कारत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर रोखले.
दिल्ली पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या सहाय्याने अीाण चेहरा ओळखण्याच्या यंत्राच्या सहाय्याने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू केल आहे. दरम्यान दंगल घडवल्याच्या आरोपावरून रविवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आयेषा घोष आणि अन्य 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडियावर सुरू असणारी निदर्शने आता आझाद मैदानात करण्यात येत आहेत. दरम्यान जेएनयुत हल्ला घडवणाऱ्यांचे बुरखे लवकरच फाडू असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज म्हणाले.
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण जेएनयुमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ निघालेल्या निषेध फेरीत सहभागी झाली. दरम्यान जेएनयुच्या विद्यार्थ्यांवरच गुन्हा दाखल करण्याच्या पोलिसांच्या कृतीचा एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी निषेध केला. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या भाजपाच्या खासदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच घोष यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवावा, असे सांगितले.
पोलिसांनी या हल्ला प्रकरणी माहिती देण्यासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन केले आहे. पुरावे गोळा करण्यासाठी न्यावैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. त्याचे छायाचित्र तज्ज्ञही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी या हल्ल्याशी सबंधित असणारी छायाचित्रे आणि फुटेज, तसेच अन्य माहिती शेअर करावी असे आदेश दिले आहेत.
हिंसाचाराच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली. महाविद्यालय आणि विद्यापीठांची आवार ही द्वेष आणि हिंसाचाराच्या राजकारणाचे अड्डे बनायला नकोत, असे ते म्हणाले.
मोर्चा रोखला
जेएनयुतील हिंसाचाराच्या निषेधार्थ सिताराम येचुरी आणि प्रकाश करात यांच्या नेतृत्वाखाली निघालेला माजी विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर रोखला. विद्यापीटाचे कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी राजीनाम द्यावा, हिंसाचार भडकावणाऱ्या हल्लेखोरांची ओळख तातडीने पटवावी आणि शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी येचुरी यांनी यावेळी केली. या मोर्चाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणाचे खासगीकरण आणि व्यापारीकरण केले जाते. त्यावेळी अनुदान थांबवावे असे जनमत बनते. गुंतवणुकीवर पुरेशा परताव्याची हमी मागितली जाते. या पुर्वीचे सरकार या विषयावर जाहीर चर्चा घडवून आणत असत. त्यातील भावना जाणून घेत आपला निर्णय मागेही घेत असत, मात्र संसदेत बहुमताच्या जोरावर हे सरकार विधेयक मंजूर करत आहे. सार्वजनिक चर्चेशिवाय अध्यादेश ही नियमित बाब बनली आहे, असे येचुरी यांनी म्हटले आहे.
बुरखे फाडू
विरोधक देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मिर शांत आहे आणि जगाने भारताची बाजू मान्य केली आहे, अशा वेळी काही जण देशात अराजक आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना लवकरच उघडे पाडले जाईल, असेही ते म्हणाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभर निदर्शने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर बोलत होते. ते म्हणाले, कॉंग्रेस अल्पसंख्यांकांचा वापर वर्षानुवर्ष मतपेढी म्हणून करत आहे. आता ते देशाचे धार्मिक विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
रॉड घेतलेले अभाविपचेच
हिंसाचाराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हातात रॉड घेतलेला युवक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पदाधिकारी असल्याचे अभाविपच्या दिल्ली सहसचिव अनिमा सोनकर यांनी सांगितले. रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले झाले होते. त्यावेळच्या व्हिडिओबाबत टाईम्स नाऊ या वाहिनीवर झालेल्या निमंत्रितांच्या चर्चेत सोनकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या दोन माणसांनी सळ्या हातात घेतल्या आहेत. त्या स्व संरक्षणासाठी घेतल्या आहेत. त्यांना व्हॉट्स ऍफ ग्रुपवर बाहेर पडताना शस्त्र सोबत ठेवण्यास सांगण्यात आले होते. सर्वच व्हॉट्स ऍफ ग्रुपवर इतकी भीती पसरली होती… तुम्ही बाहेर पडणार असाल तर गटाने बाहेर पडा, सळ्या आणि लाठ्या घेऊन बाहेर पडा. तिखटाचा स्प्रे, किंवा ऍसिड सोबत घेऊब तयार रहा असे संदेश पसरत होते. मात्र ऍसिड हल्ला झाल्याची कोणतीही घटना मी ऐकली नाही अथवा पाहिली नाही, असे त्या म्हणाल्या. हातात सळी घेतलेला माणुस अभाविपचा आहे, हे तुम्ही मान्य करता का? असे अँकरने विचारता सोनकर म्हणाल्या, होय, विकास पटेल हा आमचा कार्यकर्ता आहे. मी ते नाकारत नाही. पण ते स्वसंरक्षण होते. पुर्णत: स्व संरक्षण.
फ्रि काश्मीर बद्दल गुन्हा
जेएनयुविरोधातील हिंसाचरा दरम्यान निदर्शने करताना स्वतंत्र काश्मिरचे फलक दाखवणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी तिची ओळख पटवली असून तिचे नाव तेजल प्रभू उर्फ महेक मिर्झा प्रभू असे असून त्या कवी आणि कथाकथनकार आहेत. गेटवे ऑफ इंडिया हे निदर्शने करण्याचे स्थळ नव्हे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होईल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. आम्ही गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंदवला नाही. तर आम्ही केवळ आंदोलनाची जागा आझाद मैदानावर स्थलांतरीत केली आहे, असे देशमुख म्हणाले. स्वतंत्र काश्मिरचा फलक घेऊन फिरणाऱ्या महिलेची ओळख पोलिसांनी पटवली आहे. आम्ही तिची ओळख पटवली असून तिच्यावर गुन्हा नोंदवणयात येईल. आंदोलकांना अडचणीत आणणारे फलक त्यांनी आणू नयेत, असे आवाहन आम्ही केले आहे, असे देशमुख म्हणाले.