इंदूर : भारत-श्रीलंका दरम्यान तीन टी-२० सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ९ बाद १४२ धावा करत भारतासमोर विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
A great field day for our bowlers as Sri Lanka lose 9 wickets with a total of 142 on the board.
Scorecard 👉https://t.co/OExOCS35VC #INDvSL pic.twitter.com/Mk1k6qNN0h
— BCCI (@BCCI) January 7, 2020
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोने २०, दनुष्का गुणातालिकाने २२ आणि ओशदा फर्नांडोने ३४ धावांची खेळी करत श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने ११.३ षटकांत ३ बाद ८२ अशी मजल मारली होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठराविक धावांच्या अंतरावर बाद होत गेले आणि २० षटकांत श्रीलंकेला १४२ पर्यंत मजल मारली. वाणिदु हसरंगाने १० चेंडूत नाबाद १६ धावा केल्या.
भारतीय गोलंदाजांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने ४ षटकांत २३ धावा देत ३ गडी बाद केले. त्याने १८ व्या षटकांत ५ व्या,६ व्या चेंडूवर इसरू उदाना आणि लसित मलिंगा यांना अनुक्रमे लागोपाठ बाद केले. तर नवदीप सैनीने ४ षटकात १८ धावा देत तर कुलदीप यादवने ४ षटकात ३८ धावा देत प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वाॅशिंगटन सुंदर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ गडी बाद केला.