बंगरुळु : भारताचे तुकडे-तुकडे करणारी टोळी म्हणजे दिल्लीत बसलेले राज्यकर्ते आहेत. ते केवळ धर्मावरच नव्हे तर भाषेवर देशाचे विभाजन करीत आहेत. आम्ही अशा लोकांचा अहिंसावादी पद्धतीने प्रतिकार करू असे रामचंद्र गुहा यांनी बंगरुळूत मध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध त्यांनी बंगरुळूत निषेध नोंदवला. त्यांना आज बंगरूमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेबाबत विचारले असता रामचंद्र गुहा म्हणाले की, बंगरुळूत १४४ कलम लागू करण्याची काही गरज नव्हती. दिल्लीतून पोलिसांना आदेश दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला.
ते पुढे म्हणाले की, कलम १४४ हा वसाहती-काळातील कायदा होता. आमच्या चळवळीना दडपण्यासाठी सरकार त्याचा उपयोग करतंय.”नागरिकता दुरुस्ती कायदा देशात ध्रुवीकरण करणारा कायदा आहे. माझी अटक बेकायदेशीर आहे. आपण देशात कोणत्या प्रकारची लोकशाही राबवत आहोत?
त्यांना पंतप्रधान नरेंद मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, महात्मा गांधींचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. ते हिंदू धर्मात जन्माला आले तरी ते हिंदू धर्माबद्दल कट्टर नव्हते.
गांधी एक भारतीय होते. संपूर्ण जग त्यांच्याकडून शिकण्यास इच्छुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशात ध्रुवीकरण करणारे राजकारण करीत असल्याचे त्यानी पत्रकारांना सांगितले.