पाटणा : झुंडबळींबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहणाऱ्या 50 बुध्दीवाद्यांवर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश अखेर बिहार पोलिसांनी दिले.
आता पर्यंत केलेल्या तपासात हे आरोप तथ्यहीन आणि खोडसाळपणाचे असल्याचे निष्पन्न खाले. त्यामुळे हा तपास थांबवण्याचे आणि गुन्हा रद्द करण्याचे आदेश मी दिले आहेत, असे मुझ्झफरपूरचे वरीष्ठ पोलिस अधिक्षक मनोज कुमार यांनी सांगितले. एका स्थानिक वकीलाने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुख्य न्यादंडाधिकाऱ्यांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.