नवी दिल्ली : अयोध्येतील संवेदनशील रामजन्मभूमी-बाबरी मशिद जमीन वादावरील सुनावणी 17 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. सुनावणीच्या 37 व्या दिवसाच्या अखेरीस सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दीर्घ युक्तिवादाच्या अंतिम टप्प्याचे वेळापत्रक निश्चित केले.
या वादाचे मुस्लिम पक्ष 14 ऑक्टोबरला युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर हिंदु पक्षांना 16 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात येईल. 17 ऑक्टोबर रोजी सुनावणीचा शेवटचा दिवस असेल, असे खंडपीठाने म्हटले आहे. न्या. एस ए बॉबडे, न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस ए नझीर यांच्या खंडपीठाने यापूर्वी सुनावणी संपुष्टात आणण्यासाठी 18 ऑक्टोबरची मुदत निश्चित केली आहे.
मुख्य न्यायाधीश 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार असल्याने या प्रकरणाचा निकाल त्याच दिवशी सुनावण्यात येणार आहे.